top of page
Bakul Flowers Image.jpg
© Bakul Raut
Abstract Fluid Forms

वाहून गेले सगळे

पाऊस असा पडला की

बरीच स्वप्ने वाहून गेली ।

बरेच काही घडवायचे होते,

सगळं आता राहून गेले ।

 

घरं गेली, गुरं गेली, शेती गेली,

काहींची तर नाती सुद्धा वाहून गेली ।

खरं सांगू मित्रांनो,

ह्या वेळी पावसाने आयुष्याची मातीच केली ।

 

सगळं काही बुडाले होते,

प्राण तेवढा तरंगत होता,

या वेळी वरूण राजा भलत्याच तांबड्या रंगात होता ।

 

पाऊस जरी थांबला काही,

अश्रूंचा पूर आला मोठा,

येरे येरे पावसा म्हणता,

पैसा खरंच झाला खोटा ।

 

पाणी आता निसरू लागलं,

घरं परत दिसू लागली,

सगळी कडे मातीच माती,

पुढे काय ह्याचीच भीती,

पावसा तू हे काय केलेस,

सगळं काही वाहून नेलेस ।

 

आता रडून काही चालायचे नाही,

ह्यातून उठल्याशिवाय भागायचे नाही,

ह्या काळालाही वेळेच्या प्रवाहसोबत वाहून देऊ ।

 

काल परत यायचा नाही,

उद्या आल्याशिवाय राहायचा नाही,

प्रयत्नानेच ह्यातून बाहेर येऊ,

चला स्वप्नांना पुन्हा वाहून देऊ ।

१७ ऑगस्ट २०२१

(महाराष्ट्रातील यंदाच्या पूर संकटावर आणि पूरग्रस्थांना धीर देण्याचा प्रयत्न करण्याचा हेतूने लिहिलेली एक कविता)

00:00 / 02:00
Feel free to share:
© Bakul Raut
Comments
Share Your ThoughtsBe the first to write a comment.
Listen to the poem as a song:
bottom of page